एक सुंदर बोधकथा - देण्याचे महत्व - Moral Story in Marathi - Bodh Katha
एक सुंदर बोधकथा - देण्याचे महत्व - Moral Story in Marathi - Bodh Katha
![]() |
| एक सुंदर बोधकथा - देण्याचे महत्व - Moral Story in Marathi - vb thoughts |
एक व्यक्ती मागील दोन दिवसा पासुन वाळवंटात हरवला होता, त्याच्या जवळचे पाणी आणि जेवण संपले
होते. आता त्याची परिस्तिथी अशी होती कि जर का त्याला पाणी मिळाले नाही तर त्याचे मरण निश्चित
होते, याची जाणीव त्यालाही होती. आता तो हताश होऊन सभोवताली दूर दूर पर्यंत जेवढी नजर जाईल
तिथपर्यंत डोळे ताणून ताणून पहात होता. त्याची नजर जीव वाचवण्यासाठी पाणी शोधत होती.
होते. आता त्याची परिस्तिथी अशी होती कि जर का त्याला पाणी मिळाले नाही तर त्याचे मरण निश्चित
होते, याची जाणीव त्यालाही होती. आता तो हताश होऊन सभोवताली दूर दूर पर्यंत जेवढी नजर जाईल
तिथपर्यंत डोळे ताणून ताणून पहात होता. त्याची नजर जीव वाचवण्यासाठी पाणी शोधत होती.
तेवढ्यात त्याची नजर काही अंतरावर असलेल्या एका झोपडयावर गेली, तसाच तो थबकला.
त्याला वाटले हा भास तर नाही...?
नाहीतर मग नक्की हा मृगजळ असेल. पण काही असो, तिकडे जाऊया, काही असेल तर मिळेल असा विचार करत पाय ओढत स्वतःचे थकलेले शरीर घेऊन तो निघाला. काही वेळातच त्याच्या लक्षात आले की तो
भास नव्हता, झोपडी खरोखरच होती. पण ती झोपडी रिकामी होती, त्या झोपडीत कोणीच नव्हते आणि
झोपडीला बघितल्यावर असे वाटत होते कि बऱ्याच दिवसांपासून, कदाचित वर्षांपासून तिथे कुणीही
आलेला नाही.
आता हा पाणी मिळेल या आशेने तो आत शिरला. आणि समोरच दृष्य पाहून तो थबकलाच. माणूस मागतो
एक डोळा आणि देव देतो दोन अशी त्याची स्थिती झाली होती, तिथे बोरिंग ( एक हातपंप ) होता आणि
त्याचा पाईप जमिनीत शिरला होता. त्याच्या लक्षात आले की जमिनीखाली पाणी आहे.
हा पाईप तिथेच गेलाय. त्याच्या अंगात एकदम उत्साह संचारला. पुढे सरकत त्याने हातपंप जोराजोरात
वरखाली करायला सुरवात केली. पण पाणी काही येइना, पाण्याचा एक थेंब हि आला नाही,
नुसतात पंपाचा फक्त आवाज येत राहिला. अखेर हताश होऊन तो मटकन खाली बसला.
आता त्याला आपले मरण जाणवत होते, त्याला आता वाटायला लागले की आपले मरण निश्चिंत आहे
आणि तेही इथेच आहे, असा विचार करत तो भगवंताची आठवण करीत वर बघायला
लागला, तसेच त्याचे लक्ष कोपऱ्यात ठेवलेल्या बाटलीकडेे गेले.
परत... एक अत्यानंदाची लहर उठली. बाटली पाण्याने भरलेली होती आणि वाफ होऊन जाऊ नये म्हणून
व्यवस्थित सिल केलेली होती. चटकन तो पुढे सरकला. त्याने पाणी पिण्यासाठी बाटली उघडली तेवढ्यात
बाटलीवर लावलेल्या एका कागदाकडे त्याचे लक्ष गेले. त्यावर लिहिले होते...
ह्या बाटली मधील पाणी पंप सुरू करण्यासाठी वापरा आणि तुमचे काम
झाल्यावर ही बाटली परत पाण्याने भरून ठेवायला विसरू नका.
एक सुंदर बोधकथा - देण्याचे महत्व - Moral Story in Marathi - Bodh Katha
कागदावरील सुचना वाचून त्याचा डोका चक्रावला. त्याच्या मनात द्वंद्व सुरू झाले. काय करावे..?
या सुचनेकडे दुर्लक्ष करून सरळ पाणी पिऊन मोकळे व्हावे...? की सुचनेप्रमाणे करावे...?
त्याला काही समजत नव्हते. तो विचारात पडला की, समजा... सूचनेप्रमाणे पंपात पाणी ओतले आणि....
पंप खराब असेल तर...? पंपाचा पाईप तुटला असेल तर...? खालचे पाणी आटून गेले असेल तर...?
पाणी वायाच जाईल... सगळा खेळ खल्लास... पण... सुचना बरोबर असतील तर...? तर मग...
भरपूर पाणीच पाणी...
पाणी पंपात ओतण्याचा धोका पत्करावा की नाही यावर त्याच मत ठरेना.
शेवटी मनाचा निर्धार करत थरथरत्या हातांनी त्याने ते पाणी पंपात ओतले. डोळे मिटून देवाचा धावा केला
आणि पंप वरखाली करायला सुरवात केली. हळूहळू पाण्याचा आवाज सुरू झाला आणि काही क्षणातच
पाणी यायला सुरवात झाली. पम्प मध्ये भरपूर पाणी यायला लागले,
आणि पंप वरखाली करायला सुरवात केली. हळूहळू पाण्याचा आवाज सुरू झाला आणि काही क्षणातच
पाणी यायला सुरवात झाली. पम्प मध्ये भरपूर पाणी यायला लागले,
त्याला काय करू नी, काय नको करू,असे झाले. तो ढसाढसा पाणी प्यायला लागला.
मनसोक्त पाणी प्याला. आणि स्वतः जवळच्या सगळ्या बाटल्या पण काठोकाठ भरल्या. तो खुप खुश झाला
होता. आणि त्याचे मन ही आता शांत झाले. पाण्याने तृप्त झाल्यावर त्याचे लक्ष आणखी एका कागदाकडे गेले.
होता. आणि त्याचे मन ही आता शांत झाले. पाण्याने तृप्त झाल्यावर त्याचे लक्ष आणखी एका कागदाकडे गेले.
तो त्या परिसराचा नकाशा होता. त्यावरून सहज लक्षात येत होते की तो मानवी वस्तीपासून अजून खुप दूर
होता. पण आता निदान त्याला त्याच्या पुढच्या प्रवासाची दिशा तरी समजली होती. त्याने निघायची तयारी
केली. सुचनेप्रमाणे ती बाटली भरून सिलबंद करून ठेवली.
होता. पण आता निदान त्याला त्याच्या पुढच्या प्रवासाची दिशा तरी समजली होती. त्याने निघायची तयारी
केली. सुचनेप्रमाणे ती बाटली भरून सिलबंद करून ठेवली.
आणि त्या बाटलीवरच्या कागदावर एक ओळ स्वतः लिहीली.
विश्वास ठेवून हे पाणी पंपात ओता... पाणी येतोच
आणि तो पुढे निघाला.
तात्पर्य...
ही गोष्ट आहे देण्याचे महत्व सांगणारी.
काही मिळवण्यासाठी काही द्यावे लागते हे अधोरेखित करणारी.
काही दिल्यानंतर मिळते ते भरपूर असते आणि खूप आनंददायी असते
त्याही पेक्षा जास्त प्रकर्षाने ही गोष्ट विश्वासाबद्दल सांगते. विश्वासाने केलेले दान खुप आनंद देते.
आपल्या कृतीमुळे फायदा होईल याची खात्री नसतानाही त्याने विश्वास दाखवला.
काय होईल माहिती नसताना त्याने विश्वासाने अज्ञातात उडी मारली. या गोष्टीतले पाणी म्हणजे...
आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या गोष्टी. त्यांच्याकरता वेळ द्या आणि त्याच्या मोबद्ल्यात कितीतरी
जास्त पटीने आनंदाची झोळी भरून घ्या.

Comments
Post a Comment